Wednesday, November 24, 2010

एकमेव 8 Mar 2010, 0055 hrs IST

चूल आणि मूल या घरच्या आघाड्या सांभाळून स्वत:चं करिअर घडवणारी ही स्त्री. करिअरसाठी वेगवेगळ्या वाटा निवडतानाच पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या क्षे
त्रांतही त्यांचा सहभाग वाढू लागला. एविएशन ऑफिसर प्रतिभा सरोदे अशा स्त्रियांपैकी एक.

विमानळावर येणाऱ्या विमानात इंधन भरण्याचं काम गेली दहा ते बारा वर्षं त्या करत आहेत. हेड ऑफिसमध्ये काम करताना प्रमोशनची संधी चालून आली ती हे वेगळं काम हाती घेऊनच. एक आव्हान म्हणून हे काम स्वीकारल्यानंतर खडतर ट्रेनिंग घेणं, इंधन भरताना त्याचा दर्जा कायम ठेवण्यासाठी क्वॉलिटी चेक करणं, डॉक्युमेण्टेशन यासारख्या अनेक गोष्टींचा सखोल अभ्यास करावा लागला. अनेक परीक्षा होऊन, डायरेक्टर जनरल ऑफ सिविल एविएशन लायसन्स आणि क्वॉलिटी कण्ट्रोल सटिर्फिकेट त्यांनी मिळवलं. विमानतळावरील सर्व कामं पार पाडण्यासाठी गाडीही शिकल्या. या सर्व कष्टांचं फळ म्हणजे सलग नऊ वर्षं मुंबई आणि तीन वर्षं नाशिक विमानतळावर त्यांनी यशस्वीपणे आपलं काम पार पाडलं.

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती अशा अनेक महत्त्वाच्या व्यक्तींच्या विमानांमध्ये रिफीलिंग त्यांनी केलं आहे. केवळ एक स्त्री आहे म्हणून त्यांनी कोणत्याही सवलतींची अपेक्षा न करता इतर पुरुष कर्मचाऱ्यांप्रमाणेच र्फस्ट, सेकण्ड आणि नाइट शिफ्टही केल्या. यासाठी कधी पहाटे चार वाजता घर सोडावं लागायचं, तर कधी अपरात्री घरी परतावं लागे. तरीही जिद्दीने त्यांनी ही जबाबदारी १४ वर्षांत पार पाडली. कुटुंबियांबरोबरच सहकाऱ्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच हे शक्य झाल्याचं त्या सांगतात.

'कोणत्याही क्षेत्रात काम करताना जिद्दीने आणि सचोटीने काम केल्यास यश नक्की मिळतं. एक स्त्री आहे म्हणून काम टाळण्याच्या सबबी न सांगता पुरुषांप्रमाणेच काम करण्यास मी सक्षम आहे, हा आत्मविश्वास ठेवूनच मी प्रत्येक आव्हानाला सामोरी गेले म्हणूनच हे यश मिळवू शकले,' त्या सांगतात.

- मीनाक्षी कुलकर्णी

टॅलेण्टेड 'प्रकल्प' 7 Apr 2010, 2251 hrs IST

विद्याविहारच्या सोमय्या इंजिनीअरिंग कॉलेजचा
'प्रकल्प' हा टेक्निकल फेस्टिवल


३ एप्रिल रोजी पार पडला. मुंबई तसंच महाराष्ट्रातील इतर कॉलेजांमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रोजेक्ट्सचं प्रदर्शन यावेळी मांडण्यात आलं होतं. वायरलेस ऑटोमॅटिक रेल्वे क्रॉसिंग गेट, स्पाय रोबोट, हायवे स्पीड सेन्सिंग, मल्टिपल फेस डिटेक्शन यासारखे अफलातून प्रोजेक्ट्स ठेवण्यात आले होते. मात्र, आकर्षणबिंदू ठरला तो यश मुळगावकरने तयार केलेला 'रोबोटिक आर्म'. मानेच्या हालचालीनुसार या हाताची हालचार ठरते. पाणी पिणं, खाणं, वस्तू (अर्ध्या किलो वजनापर्यंतच्या) उचलून दुसरीकडे ठेवणं अशी कामं हा रोबोटिक आर्म सहज करतो.

एका हाताने अपंग असणाऱ्या व्यक्तींसाठी अशा स्वरुपाचा हात नक्कीच उपयुक्त ठरू शकतो. या रोबोटिक आर्मचं वैशिष्ट्य म्हणजे हा धातूचा हात बसवण्यासाठी कोणत्याही महागड्या ऑपरेशनची गरज नाही. प्राथमिक स्थितीत असणारा या रोबोटिक आर्ममध्ये अधिक सुधारणा करून या वर्षअखेरीस तो बाजारात आणण्याचा हेतू असल्याचं यश सांगतो. सध्या प्रोजेक्ट म्हणून हा आर्म बनवण्यात आला असला, तरी त्याला व्यावसायिक स्वरुप देण्यात येईल. या आर्ममुळे अपंगांना खऱ्या अर्थाने मदतीचा हात मिळाला आहे, असं म्हणायला हरकत नाही.

सुपरफास्ट

रोबोटिक आर्मप्रमाणेच ओरियन रेसिंग कारनेही उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. फॉर्म्युला वनमधील गाड्यांसारखीच ही रेसिंग कार आहे. या गाडीमध्ये अधिकाधिक अचूकता आणण्यात आली असून गेल्या वषीर् जर्मनीमधील सोसायटी ऑफ ऑटोमोटिव इंजिनीअर्सतफेर् घेण्यात येणाऱ्या स्पधेर्मध्ये बक्षीसही मिळवलं होतं. या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे वळण घेताना गाडीचा वेग खूप कमी करावा लागत नाही.ं

मदतीचा रोबोहात

रोबोटिक आर्म भविष्यात अतिशय उपयोगी ठरेल. अपंगांसाठी हा आर्म खूप उपयुक्त ठरू शकतो. पेशण्ट्सवर याचा प्रयोग करून प्रत्यक्षात काय अडचणी येऊ शकतात, ते कळेल आणि त्यानुसार पुढील पावलं उचलली जातील असं कॉलेजचे प्रोफेसर मिलिंद मराठे यांनी सांगितलं.

-मीनाक्षी कुलकर्णी

गोष्ट चांगलीच, पण... 14 Apr 2010, 0022 hrs IST

पाच लाखांहून अधिक विद्यार्थी.. ३०० हून अधिक कोसेर्स.. ६०० हून अधिक संलग्न कॉलेजं... मुंबई विद्यापीठाचा हा व्यापच आता विद्यार्थ्यांची डोकेदुखी ठरु
लागलाय. भ्रष्टाचार, गोंधळ यामुळे गेल्या १५० वर्षांची पंरपरा धुळीत मिळत चाललेल्या या विद्यापीठात आता विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी वेगळे कॅम्पस तयार करण्याचं वारं वाहू लागलंय. अशा पर्यांयामुळे विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटतील का, कर्मचारी अधिक कार्यक्षम होतील, की त्यांना भ्रष्टाचाराचं नवं कुरण मिळेल, कोणत्या विद्यार्थ्यांना त्याचा नेमका फायदा होईल, याविषयी बिनधास्त बोलमध्ये विद्यार्थ्यांनी आपली मतं ठामपणे मांडली.

विकेंदीकरणातून विकास

विद्यापीठाच्या शाखा उघडण्याचा निर्णय उपनगरांतल्या मुलांसाठी खूप चांगला आहे. अनेक विद्यार्थ्यांना लेक्चरसाठी विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये जावं लागतं. पावसाळ्यात तर हे खूपच त्रासदायक ठरतं. तसंच विद्यापीठात होणारे अनेक कोसेर्स अशा शाखांमुळे जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचतील. विद्यापीठाच्या विकासासाठीही हा निर्णय खूप चांगला आहे. विकेंदीकरण झालं, तर जास्त विकास होईल.

अदिती धुपकर, डोंबिवली



क्वालिटीचं काय?

विद्यापीठात सध्या अॅडमिनिस्ट्रेटिव्ह कामाचा कचरा झालाय. कालिनाच्या महात्मा फुले भवन म्हणजेच एक्झाम हाऊसमध्ये जो गोंधळ चालतो तो यामुळे काहीसा कमी होईल. पण असं विकेंदीकरण झालं, तर इतर ठिकाणच्या विद्यार्थ्यांना मुंबईत मिळणाऱ्या तोडीचंच शिक्षण मिळेल का, हा पण खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. माझ्या मते इतर ठिकाणच्या विद्यार्थ्यांना ती क्वालिटी नाही मिळणार.

रिंकेश धारोड, एमए पार्ट टू हिस्ट्री

गोंधळात भरच

काय फायदा होणार आहे विद्यापीठाच्या शाखा वाढवून? काहीच नाही. उलट आत्ता जो गोंधळ सुरू आहे, तो दुप्पट तिप्पट वाढेलच. सध्या दोन कॅम्पस असताना लेक्चरचा सगळा भार तसाही कलिना कॅम्पसवरच पडतो. फोर्ट कॅम्पसला विद्यार्थ्यांच्या दृष्टीने फार काही होतच नाही. त्यातून विद्यापीठाच्या अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये जो सावळागोंधळ सुरू आहे, त्याचं काय?

मयुरेश कापसे, एमए पार्ट वन

पॉलिटिकल सायन्स

उपनगरातल्या मुलांना फायदा

माझ्या मते हा निर्णय खूप चांगला आहे. कल्याण, भाईंदर किंवा दहिसर, पनवेल अशा ठिकाणी विद्यापीठाच्या शाखा उघडल्यास अनेक विद्यार्थ्यांना खूप बरं पडेल. या व्यतिरिक्त आणखी काय फरक पडेल हे आत्ता सांगणं कठीण आहे. पण, विद्यापीठात चालणारे कोसेर्स इतर शाखांमध्येही चालायला हवेत. बाकी काही फायदा होईल, असं आत्ता तरी सांगण कठीण आहे. तरच त्याचा खरा फायदा विद्यार्थ्यांना मिळेल.

श्रीकला भागवत, एमए मराठी

प्रॉब्लेमच्या मुळाशी जायला हवं

मुंबई विद्यापीठाच्या कारभारात गोंधळ कशामुळे झाला याची चौकशी व्हावी. यापूवीर् जेव्हा विद्यापीठ लोकप्रियतेच्या शिखरावर होतं तेव्हा विकेंदीकरणाची गरज वाटली नव्हती. मुद्दा हा, की तिथल्या कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉश केलं पाहिजे. कॅम्पस वाढवणं चांगलं आहेच. पण, प्रॉब्लेमच्या मुळाशी जाऊन शोध घेतला पाहिजे. नाहीतर, कलिनापुरता मर्यादित असलेला विद्यापीठाचा गोंधळ उपनगरातही पसरेल. त्यानंतर मात्र मागे फिरण्याचा ऑप्शन बंद झाला असेल.

अनिकेत माने, एमए समाजशास्त्र

भ्रष्टाचाराचं नवं कुरण

विद्यापीठाचं विभाजन होतंय हे प्रशासकीय कामकाजासाठी चांगलं आहे. कारण विद्यापीठाचा आवाका मोठा आहे. कार्यपद्घती सुरळीत होण्यासाठी अशा विभाजनाची गरज आहे. त्यानिमित्ताने गोंधळ तरी कमी होईल. पण भ्रष्टाचाराला नवीन जागा मिळणार हे नक्की.

पियुष झा, एमबीए स्टुडण्ट

दजेर्दार अभ्यासक्रम हवा

विद्यापीठाचं विभाजन झालं, तरी शिक्षणाचा दर्जा सुधारणार आहे का? नवी विद्यापीठांबरोबरच चांगल्या सुविधा आणि दजेर्दार अभ्यासक्रमांसाठी प्रयत्न होऊन तशा स्वरुपाचा प्रस्ताव आल्यास बरं होईल.

अन्वया खडेर्, मास्टर इन जर्नालिझम र्फस्ट इयर

चांगला निर्णय

विभाजनाचा निर्णय चांगला आहे. मुंबई विद्यापीठाला विभाजनाची खरोखर गरज आहे. यामुळे गुंतवणूक, कार्यक्षमता तसंच शिक्षणाच्या दर्जामध्ये नक्कीच सुधारणा होईल.

धनश्री पाताडे, मास्टर इन जर्नालिझम

सेकण्ड इयर

संवाद चांगला हवा

विभाजनामुळे कार्यपद्घतीत सुधारणा आली, तरी नव्या कॅम्पसला नाव नसेल. त्यामुळे परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचण होऊ शकते. नव्याने निर्माण होणाऱ्या कॅम्पसचं आणि मूळ मुंबई विद्यापीठांचं कम्युनिकेशनही उत्तम असायला हवं. नाहीतर, मुलांचे हाल होतील, हे नक्की.

राजेश महाजनी, एमए इकानॉमिक्स

वेळेची बचत

आम्ही रुपारेल कॉलेजमधून एमएससी करत असलो, तरी थिअरीसाठी सर्व कॉलेजचे विद्याथीर् कलिनालाच एकत्र जमतात. म्हणजे प्रॅक्टिकल एकिकडे आणि थिअरी दुसरीकडे असते. अशा वेळेस जाण्या-येण्यातच खूप वेळ जातो. मग अभ्यास तरी कधी करणार? पण जर ठाण्यासारख्या मध्यवतीर् ठिकाणी कॅम्पस झालं तर प्रॅक्टिकल आणि थिअरी एकत्र करता येईल. त्यामुळे उपनगरात राहणाऱ्यांचा बराच वेळ वाचेल, तोच वेळ अभ्यासासाठी वापरता येईल.

रेणुका फणसळकर, एमएससी, रुपारेल कॉलेज

हजेरी वाढण्यास मदत

कल्याण , डांेबिवलीला विद्यापीठाची सब सेण्टर्स असली, तरी तिथे फक्त अॅडमिशन होऊ शकते. पण स्टडी मटेरियल, हॉल-तिकीट अशा अनेक गोष्टींसाठी वा लेक्चरसाठी कल्याण, बदलापूर किंवा त्यापुढे राहणाऱ्यांना खूप लांब यावं लागतं. कॅम्पसचं विकेंदीकरण झालं तर खूप वेळ वाचेल. त्यामुळे हजेरी वाढेल. नोकरी करणाऱ्यांना किंवा काही अडचणी उद्भवल्या तर या कॅम्पसचा उपयोग होऊ शकतो.

मिनल निजसुरे, एम.कॉम, करस्पॉडन्स,

व्यवस्थापनावरचा ताण कमी होईल

हे विभाजन झालं तर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवरचा ताण कमी होईल. तसंच जवळच्या अथवा मध्यवतीर् ठिकाणी विद्यापीठ असल्याने नोकरी करणारे आणि तिथे राहणारी मुलं लेक्चरला रेग्युलरली जाऊ शकतील. याचा फायदा पावसाळ्यात जास्त होईल.

श्रेयस राऊत, एमएससी.

मुलांची संख्या वाढेल

विद्यापीठाचा स्टाफ मोठा आहे. को-ऑॅपरेटिव्हही आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मुलांना कॉलेज अटेण्ड करायचं असतं. पण प्रवास मोठा असल्याने अनेक अडचणी असतात. विद्यापीठाच्या शाखा वाढल्या तर मुलांची संख्या वाढेल.

अपूर्वा कुलकणीर्, पोस्ट ग्रॅज्युएशन, ट्रॅव्हल-टुरिझम.

.

हॉस्टेलचा खर्च वाचेल

पोस्ट-ग्रॅज्युएशन लेव्हलला एक-दोन लेक्चर्स असतात, त्या एक-दीड तासाच्या लेक्चरसाठी रोज तीन-साडेतीन तास प्रवास करण्यात घालवावे लागतात आणि संेट्रलच्या लोकांना पावसाळ्यात ट्रेन्समुळे खूपच त्रास होतो. कित्येक मुलं तर प्रवास वाचवण्यासाठी हॉस्टेलमध्येही राहतात, त्यांचाही खर्च कमी होईल.

निलेश आवारी, एमएससी.

संवाद वाढेल

एकाच वेळी अनेक कोसेर्स सुरु असल्याने लाखांेच्या संख्येने विद्याथीर् युनिव्हसिर्टीत शिकतात. आणि त्यामुळेच तिथल्या कर्मचाऱ्यांवर मोठा ताण येतो. पर्यायाने विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होतं. या विभाजनामुळे शिक्षक व कर्मचारी आणि मुलं यांच्यात संवाद वाढेल.

पवन यादव, एमएससी, करस्पॉडन्स

कार्यक्षमता वाढेल

मुंबई विद्यापीठाचा पसारा मोठा आहे. कार्यक्षेत्रं लांबवर पसरल्यामुळे विद्यार्थ्यांना लहान-सहान कामांसाठी कलिना कॅम्पसपर्यंत यावं लागतं. विद्यापीठाची केंद सुरु झाली, तर विद्यार्थ्यांचे कष्ट आणि वेळ वाचेल. त्याचप्रमाणे सध्या कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवरचा कामाचा ताण हलका होईल. त्यामुळे कदाचित त्यांची कार्यक्षमतासुद्घा वाढेल.

अमरीश पवार, एमएससी फिजिक्स,

भवन्स कॉलेज

केंदं नेटकी असावीत

विभाजनापेक्षा केंद सुरु करून ती नीट आणि पद्धतशीरपणे चालवावीत. अनेक कॅम्पस सुरु केल्याने नुकसान अधिक होईल. एखादी बँक नवी शाखा काढते तेव्हा ती आपलं नाव बदलत नाही. त्याप्रमाणे विद्यापीठाने केंदं सुरु करावित. शिवाय, या नव्या केंदाना स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जाही नसावा.

स्नेहा सराफ, एमएससी, लाइफ सायन्स



कॉलेजियन्सचा दिवाळी कट्टा 28 Oct 2010, 1233 hrs IST

सुट्टी असली, तरी कट्ट्यावर ग्रुपने भेटणं कॉलेजियन्सना आवडतं. पण, सध्या दिवाळीच्या पूर्वतयारीत ही मंडळी प्रचंड बिझी आहेत. कुणी घराची साफसफाई क
रतंय, कुणी वडिलांना रंगकाम करण्यात मदत करतंय, तर मुली किचनमध्ये आईला फराळ बनवण्यात हेल्प करताहेत. एकंदरच काय, सगळीकडे दिवाळीची तयारी सुरू असल्याचंच चित्र दिसून येतंय.

' चला, दिवाळी जवळ आली. कामाला लागा...' अशी हाक आईने दिल्यामुळे तमाम कॉलेजियन्स सध्या घरात दिवाळीची तयारी करण्यात गुंतलेले आहेत. परीक्षा संपल्यामुळे 'रिकामटेकडे' झालेले हे कॉलेजियन्स घरातल्या खोल्यांमध्ये मुक्त संचार करताहेत. एरव्ही सुट्टीतही कट्ट्यांवर दिसणारी ही मंडळी सध्या घराची साफसफाई, रंगरंगोटी, फराळाची तयारी करण्यात बिझी आहेत. त्यामुळे सगळे कट्टेही ओस पडलेले दिसताहेत.

सकाळी उठून घरातली साफसफाई त्यानंतर दुपारी फराळाला मदत आणि संध्याकाळी 'अत्यावश्यक' वस्तूंची खरेदी असा कॉलेजियन्सचा सध्याचा दिनक्रम आहे. अगदी स्वत:चा खण आवरण्यापासून ते घरातल्या माळ्यावर चढून साफसफाई करेपर्यंत या मंडळींनी मजल मारली आहे. काहींसाठी ही कामं त्यांच्यावर घरच्यांनी लादलेली आहेत, तर काहीजणांना त्यात मजा येतेय. आरकेटी कॉलेजमध्ये एसवायबीएस्सी करणाऱ्या विरेंद महाजन आणि त्याच्या मित्रांनी प्रत्येकाच्या घरात आळीपाळीने रंग लावण्याचं ठरवलंय. तर मॉडेल कॉलेजचा सुशील पाटील घराचं रंगकाम करण्यात वडिलांना मदत करतोय.

घरात उत्साहाने अशी कामं करायला तयार होण्यामागे (किमान तसा उत्साह दाखवण्यामागे) या मंडळींची खास कारणंही आहेत. खरेदीचं अर्थकारण यामागे असल्याचं कॉलेजियन्स आवर्जून सांगतात. काम पूर्ण केल्यावर खरेदीच्या वेळी आपल्या मनाजोगी खरेदी करता येते. अगदी कपड्यांपासून बाईकपर्यंत आणि मोबाइलपासून लॅपटॉपपर्यंतच्या मागण्या पूर्ण करून घेता येतात, असं अनेक विद्यार्थ्यांना वाटतं. घरातल्या घरात एक प्रकारची एक्सचेंज ऑफरच असते ही.

एकीकडे झाडलोट, रंगरंगोटी करण्यात मुलं बिझी असतानाच कॉलेजमधल्या तमाम मुली सध्या किचनमध्ये आईला फराळ करण्यात गुंतलेल्या आहेत. कढईमध्ये पीठं भाजण्याचे दिवस सुरू झाले आहेत. सुट्टी लागल्यामुळे घरातल्या कामांमध्ये मदत करणं सुरू झालंय. मला मुळातच घरकामाची आवड असल्याने पूर्ण घराची साफ-सफाई करणं, फराळ बनवण्यात हातभार लावणं ही कामं मी आवडीने करते, असं पंेढारकर कॉलेजमध्ये टीवायबीकॉमला शिकणारी मधुरा कुलकणीर् सांगते. स्वखुशीने अशा कामांमध्ये झोकून देणाऱ्या मुलींची संख्या तशी फारशी नसली तरी पर्याय नसल्यामुळे त्यात आनंद मानायला लागतोय. रांगोळ्यांचा बॉक्स शोधून काढणं, नवीन डिझाइन्स बघणं, पणत्या रंगवणं अशा कामांचा 'अभ्यास' आता सुरू झालाय.

घरातल्या तयारीबरोबरच काही जण चक्क आई-वडिलांबरोबर खरेदीला जायला लागले आहेत. ही खरेदी स्वत:साठी नसून घरच्या जिन्नसांची आणि परमपूज्यांच्या कपड्यांची आहे. त्यामुळे 'मी संध्याकाळी ७ वाजता स्टेशनवर भेटेन. तयार रहा. आज ड्रेस मटेरियल घेऊनच टाकू,' असे संवाद वडीलधारे आणि आपले कॉलेजियन्स यांच्यात घडत आहेत. कटिंग पीत कट्ट्यावर गप्पा हाणण्याच्या संध्याकाळच्या वेळी ही मुलंमुली हातात दोन-दोन पिशव्या घेऊन खरेदीला जाताना दिसताहेत. फक्त कपड्यांपुरतीच मर्यादित असणारी त्यांची शॉपिंग दिवाळीच्या निमित्ताने पडदे, चादरी, उशांचे अभ्रे इतकंच काय पण, कपबशा, भांड्याकुंड्यापर्यंत जाऊन पोहोचलीय.

- श्रीकांत सावंत,
मीनाक्षी कुलकर्णी
( कॉलेज क्लब रिपोर्टर)

वादच नाय 25 Nov 2010, 0014 hrs IST

कट्ट्यावर बोलबच्चन देणारे, मस्का मारून समोरच्याला पटवणारे असे सगळेच जण कॉलेज फेस्टिव्हलमध्ये आपले हिडन टॅलेण्ट्स वापरत असतात. मल्हार, उमंग, मूड-आयस
ारखे फेस्टिव्हल्स हिट ठरण्यामागे अशाच अत्रंगी पण, हुश्शार कॅरेक्टर्सचा हात असतो. माकेर्टिंग, हॉस्पिटॅलिटी, सिक्युरिटी अशा वेगवेगळ्या टीम्स या फेस्टसाठी राबत असतात. हाच फॉर्म्युला तुम्ही वापरला, तर तुमचा कॉलेज फेस्टिव्हलही रॉकिंग होईल यात वादच नाय!!!

' यार, यंदाचा मल्हार काय मस्त होता ना' किंवा 'छ्यॅ, या वेळी त्या फेस्टला इतकी मजा नाही आली,' असे अनेक प्रकारचे शेरे प्रत्येक कॉलेज फेस्टिव्हलनंतर ऐकायला मिळतात. पण, एखादा फेस्टिव्हल आयोजित करण्यासाठी त्या-त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी खूप परिश्रम घेतलेले असतात, याचा या शेरेबाजांना अनेकदा विसर पडतो. कॉलेज कोणतंही असो; फेस्टिव्हल हा त्या कॉलेजचा मानबिंदू समजला जातो. तो चांगला व्हावा, यासाठी कॉलेजचे काही विद्याथीर् महिनो न् महिने तयारी करत असतात.

कॉलेज फेस्टिव्हलची तयारी सुरू होते, ती वेगवेगळी कामं करणाऱ्या ग्रुपच्या निवडीतून! यात इन्फ्रास्ट्रक्चर, सिक्युरिटी, हॉस्पिटॅलिटी, माकेर्टिंग, मीडिया अशा अनेक टीम्सचा सहभाग असतो. त्या टीमची कामं, त्यांच्या को-ऑडिर्नेटर्सचा अनुभव आणि त्या अनुभवातून त्यांना मिळालेलं शहाणपण याची बाकीच्यांना कल्पनाही नसते. ते शहाणपण आणि तो अनुभव विविध कॉलेजांमधील काही को-ऑडिर्नेटर्सच्याच शब्दांत...

आमच्या टीमचं काम गेल्या चार-पाच वर्षांत खूपच वाढलंय. पब्लिसिटी टीम आणि आम्ही हातात हात घालून कामं करतो. कॉलेजच्या फेस्टिव्हलला आणि पर्यायाने कॉलेजला प्रसारमाध्यमांद्वारे प्रसिद्धी मिळवून देणं, हे आमच्या टीमचं मुख्य काम असतं. त्यासाठी मीडियाच्या अभ्यासाची खूपच गरज असते. फेस्टिव्हलची थीम मीडियाद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं, तसंच एखाद्या पेपरसोबत किंवा न्यूज किंवा रेडिओ चॅनलसोबत टायअप करणं यात आमचा महत्त्वाचा वाटा असतो. इव्हेण्टला जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी आमची टीम सतत झटत असते. त्यामुळे मीडियात वावरणाऱ्या माणसांशी कसं बोलावं, वागावं, याचं उत्तम ज्ञान मिळतं. भविष्यात एखाद्याला त्या क्षेत्रात करिअर करायचं असेल, तर त्याच्या ओळखीही होतात.

रिद्धी गोळवणकर, भवन्स

अॅन्युअल फेस्टिव्हलसाठी कॉलेजकडून मोठं बजेट मिळणं कठीण असतं. अशा वेळी फेस्टिव्हल झोकात पार पाडण्यासाठी प्रायोजक मिळवावे लागतात. यासाठी फेस्टिव्हलआधी आठ-नऊ महिने आधीपासून आम्ही मेहनत करत असतो.

प्रायोजक शोधणं, त्यांच्यासमोर फेस्टिव्हलची थीम सादर करणं आणि मग, त्यांच्याकडून स्पॉन्सरशिप मिळवणं हे सगळं आम्ही बघतो. स्पॉन्सर्स आणि कॉलेज या दोघांच्या दृष्टीने ते फायद्याचं असतं. दुसरा फायदा म्हणजे अनेक कंपन्या कॅम्पसवर येतात. त्या आपले काही इव्हेण्ट्सही ठेवतात. त्याचाही फायदा क्राऊडला होतो. व्यक्तिश: म्हणाल, तर माझी कम्युनिकेशन स्किल्स वाढायला माझ्या को-ऑडिर्नेटरशिपची खूपच मदत झाली. २४ जण मिळून एक ग्रुप म्हणून काम करणं हेसुद्धा खूप शिकवून जातं. तुमच्यात टीम स्पिरिट वाढतं. स्पॉन्सरर्ससमोर प्रेझेण्टेशन केल्याने सादरीकरणाचं कौशल्यही वाढतं.

अभिषेक कोरी, साठ्ये

एखाद्या फेस्टिव्हलची थीम ठरल्यानंतर ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं, हे आमचं काम असतं. त्यासाठी आम्ही फेस्टिव्हलच्या सात-आठ महिने आधी कामाला लागतो. त्या थीमशी निगडीत पोस्टर्स, ब्रोशर्स, पॅम्प्लेट्स बनवून घेणं, ती योग्य ठिकाणी पोहोचवणं आदी सगळी काम करण्यासाठी आम्ही रात्रंदिवस झटतो. आता तर सोशल नेटवकिर्ंग साइटवर फेस्टिव्हलचं पेज वगैरे तयार केलं, तरी खूप पब्लिसिटी होते.

फेस्टिव्हलची पब्लिसिटी करण्यासाठी त्याच्याशी निगडीत इव्हेण्ट्स ऑर्गनाइझ करण्यातही अनेकदा आमचा हातभार असतो. फेस्टिव्हल होतो, हे अनेक कॉलेजांमध्ये माहिती असतं पण, त्यात नवीन काय हे सांगण्याचं काम पब्लिसिटी टीम करते. तसंच नवनवीन कॉलेजांनी फेस्टिव्हलमध्ये भाग घ्यावा, याकडेही ही टीम लक्ष ठेवून असते. पब्लिसिटी टीममध्ये काम करून टीमवर्कचा चांगला धडा मला मिळाला. काहीतरी शिकणं, हे तर होतंच असतं. पण, त्याहीपेक्षा जास्त म्हणजे एकत्र येऊन मजा कधीच विसरणं शक्य नाही.

रोहित श्रॉफ, आयआयटी

गेली दोन वर्षं मी हॉस्पिटॅलिटीचं काम सांभाळतेय. संपूर्ण फेस्टिव्हलमध्ये येणाऱ्या परीक्षकांचं, सेलिब्रिटींचं आदरातिथ्य करणं, त्यांच्या आणि सगळ्या व्हॉलेंटिअर्सच्या खाण्यापिण्याची जबाबदारी हॉस्पिटॅलिटी टीमवर असते. इव्हेण्टच्या ठिकाणी पाण्याच्या बाटलीपासून स्नॅक्सपर्यंत सगळ्या खाण्यापिण्याच्या गोष्टी व्यवस्थित गेल्या की नाही, ही जबाबदारी आमची असते. त्याशिवाय बॅकस्टेज आटिर्स्टची सगळी व्यवस्था बघावी लागते. फेस्टिव्हलसाठी हॉस्पिटॅलिटी टीममध्ये काम करून टाइम मॅनेजमेण्ट जमू लागलं. तसंच तुमच्या कामात एवढीही चूक चालणार नसल्याने आपोआप 'पफेर्क्शन' येत गेलं. या टीममध्ये काम केल्यानं तुम्ही उत्तम 'होस्ट' बनू शकता. त्यामुळे भविष्यात कोणतंही काम करताना दडपण निश्चितच जाणावणार नाही.

पृथा दावडा, सोमय्या कॉलेज

' मल्हार'सारख्या मोठ्या फेस्टिव्हलसाठी हॉस्पिटॅलिटीचं काम सांभाळणं खूपच आव्हानात्मक असतं. मुंबईबाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या राहण्याची, खाण्यापिण्याची सोय बघणं, त्यांना रिसिव्ह करणं, हॉटेल बुक करणं, आवश्यक ती मदत पुरवणं अशी अनेक कामं आम्हाला करावी लागतात. त्याशिवाय कॉलेजमधल्या व्हॉलेंटिअर्सची सोय करणं, कॅटरर्स ठरवणं वगैरेही कामं आमचीच असतात. ही सगळी काम करताना माझा झालेला फायदा म्हणजे माझा संयम खूप वाढला. तसंच अनेक समस्या हाताळायला शिकले.

हेन्ना खेमानी, सेण्ट झेविअर्स कॉलेज

आमचं काम सुरू होतं, ते फेस्टिव्हलच्या दिवशी! कॉलेजमध्ये फेस्टिव्हलदरम्यान पूर्ण सुरक्षा ठेवणं हे या टीमचं काम. त्यासाठी आमच्याकडे व्हॉलेंटिअर्सची खंदी टीम तयार असते. आत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची तपासणी करून मगच त्यांना सोडलं जातं. फेस्टिव्हलदरम्यान डीओडरण्ट, टोकदार वस्तू, पावडर, बाटल्या अशा गोष्टी कॅम्पसमध्ये जाणार नाहीत, याची काळजी आम्ही घेतो. त्यासाठी बूटांपासून कमरेच्या पट्ट्यापर्यंत सगळ्या गोष्टी तपासण्याचं काम आमच्या हाती असतं. अनेक कॉलेजांमध्ये तर सिक्युरिटी टीमला फायर फायटिंग ट्रेनिंगही दिलं जातं. सिक्युरिटी टीम ही फेस्टिव्हलसाठी महत्त्वाची असते खासच! संपूर्ण इव्हेण्ट सुरळीत पार पडण्याची जबाबदारी आमच्यावर असते. आम्हाला फेस्टिव्हलची मजाही धड लुटता येत नाही पण, त्याबाबत आमची तक्रार नाही. कारण आपल्यामुळे इतर विद्याथीर् एन्जॉय करतात, याचंच समाधान मोठं असतं. झटपट निर्णय घेणं हे याचमुळे आम्हाला शिकायला मिळतं, ते वेगळंच!

राजीव अभंग, रुईया कॉलेज
संकलन : मधुरा आपटे, मीनाक्षी कुलकर्णी
कॉलेज क्लब रिपोर्टर

आवाज दो... कहाँ है? 25 Nov 2010, 0014 hrs IST

नोव्हेंबर महिना संपत आला तरी कॉलेजेसमध्ये जीएस नसल्याने स्टुडण्ट्सना त्याची उणीव भासतेय. फेस्टिव्हल्स तोंडावर असताना ' मुंबई
टाइम्स'ने यावर प्रथम आवाज उठवला. विद्यार्थ्यांनीही बिनधास्तपणे आपल्या प्रतिक्रिया यातून व्यक्त केल्या. 'आम्हाला आमचा हक्काचा आवाज द्या' अशी जोरदार मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तसंच युनिव्हसिर्टी आणि विद्याथीर् नेत्यांनीही याबाबत आपली भूमिका 'बिनधास्त बोल'मध्ये मांडली आहे.

जीएस हवाच

मुळात दरवषीर् जीएसची निवड ही कॉलेजांमध्ये गणेशोत्सवाच्या आधी होत असते. गेल्या वषीर्ही असा प्रॉब्लेम झाला होता पण त्याची फारशी चर्चा झाली नाही. यंदाही एकूण परिस्थिती पाहता जीएसच्या निवडीला डिसेंबरअखेर किंवा जानेवारीच उजाडेल असं वाटतं. खरं तर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात कॉलेजेसमध्ये अनेक इव्हेण्ट्स, फेस्टिव्हल्स होत असतात. त्यामुळे तेव्हा जीएस असणं आवश्यक असतं. स्टुडण्ट्सचं म्हणणं पोहोचवणं हे जीएसचं प्रमुख काम. जीएसची निवड कॉलेज सुरू होतात तेव्हा म्हणजे जुलै महिन्यातच होऊ शकली तर अनेक अॅक्टिव्हिटींच्या दृष्टीने त्यांचा उपयोग होतो. पण तरीही जीएस असणं हे मात्र आवश्यक आहेच. युनिव्हसिर्टीने जुलै-ऑगस्ट महिन्यातच ही प्रोसेस पूर्ण करून जीएसची निवड करून घेतली पाहिजे. कारण जीएस हा विद्यार्थ्यांचा आवाज आहे हे नक्की आणि तो कोणत्याही परिस्थितीत दाबला जायला नको.

आदित्य शिरोडकर
अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
...........................................................

इंजिनीअरिंग अॅडमिशन्समुळे उशीर

गेली अनेक वर्षं जीएसची निवडणूक प्रक्रिया सर्वसमावेशक व्हावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते. यंदा इंजिनीअरिंगच्या प्रवेशप्रक्रियेला खूप उशीर झाला. इतर कॉलेजांप्रमाणे इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनाही प्रोसेसमध्ये आणणं गरजेचं होतं. यामुळेच यावषीर् जीएसची निवडणूक लांबली. यात कोणत्याही प्रकारचं राजकारण असण्याचा प्रश्नच नाही. जीएसचा रोल फक्त फेस्टिव्हल्सपुरता मर्यादीत असतो हा दृष्टीकोन न ठेवता तो एकूणच एज्युकेशनल मूव्हमेण्टचा भाग असतो असं आम्हाला वाटतं. पण युनिव्हसिर्टी अॅक्टप्रमाणे कोणत्याही राजकीय गोष्टी निवडणुकांमध्ये आणायला उमेदवारांना परवानगी दिली जातं नाही. त्यामुळे फक्त इंजिनीअरिंगच्या अॅडमिशन प्रक्रियेमुळे हा उशीर झालाय. निवडणुकांचं र्सक्युलर एकदाच निघतं. एका वर्षात दोनदा निवडणुका घेणं शक्यही होतं नाही.

मृदूल निळे
डायरेक्टर (डिपार्टमेण्ट ऑफ स्टुडण्ट वेल्फेअर)

...........................................................

राजकारण्यांचं शक्तीप्रदर्शन

जीएस म्हणजे विद्यार्थ्यांचा आधारस्तंभ. परंतु जीएसच्या निवडणुकीमागे मुंबई युनिव्हसिर्टीचा काही डाव असेल असं मात्र वाटत नाही. युनिव्हसिर्टीला आधीच इतके व्याप आहेत की कदाचित त्यातून ही निवडणूक राहून गेली असेल. जीएस नसल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या अडचणी मांडता येत नाहीत हे मात्र खरं. फेस्टिव्हलच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांचं आयोजन ज्यांना करायचं आहे ते करणारच. प्रत्येकाला वाटतं की आपण फेस्टिव्हल हेड असावं पण ते शक्य होऊ शकत नाही. त्यामुळे हे असे राडे होत असतात. अशा राड्यांमागे राजकारण्यांचं शक्तीप्रदर्शनच होत असतं. जीएस असल्यामुळे त्याला थोड्याफार प्रमाणात आळा बसतो हे मात्र खरं. विद्यार्थ्यांना याचा काही फरक पडत नाही. कारण त्यांना हे राडे पचवण्याची सवय झाली आहे. फेस्टिव्हलमध्ये असे राडे केल्यानेच रंगत येते. ती येण्यासाठीच असे प्रकार घडवावे लागतात. पण म्हणूनच जीएस असल्या-नसल्याने फारसा फरक पडत नाही.

मीनाक्षी पवार
मुंबई युनिव्हर्सिटी

...........................................................

भार कल्चरल लीडर्सवर

आतापर्यंत दिवाळीची सुट्टी असल्याने काही प्रॉब्लेम नव्हता. पण आता कॉलेजेस सुरू होतील आणि अजूनही जीएसचा पत्ता नाही. अवघ्या महिनाभराच्या अंतरावर आलेल्या कॉलेज फेस्टिव्हल्सच्या तयारीबद्दल प्रश्न निर्माण झाला आहे. जीएस नसल्यामुळे आमच्या कॉलेजच्या सगळ्या कल्चरल अॅक्टिव्हिटीजचा भार दोन कल्चरल लीडर्सवर पडतोय. कॉलेजबाबत स्टुडण्ट्सना जाणवणारे सगळे प्रॉब्लेम तसेच रेंगाळत पडले आहेत.

आदित्य काळे
एफवायबीकॉम, सीएचएम कॉलेज

...........................................................

फेस्टिव्हल्सचं प्लॅनिंग रखडलं

जीएसच्या नेमणुकीला होणाऱ्या उशिरामुळे फेस्टिव्हल्सचं प्लॅनिंग बोंबलतंय. जबाबदारी कुणी घ्यायची हेच ठरलेलं नसल्याने वेळ फुकट चालला आहे. कॉलेजची लेक्चर्स वेळेवर न होण्यामुळे अभ्यासावर आणि प्रोजेक्ट्सवर त्याचा परिणाम झाला आहे. या साऱ्याबाबत बोलणारं मात्र कुणीच नाही.

सुशील अहिरे
टीवायबीएमएम, एस.के.सोमय्या कॉलेज

...........................................................

माहिती मिळत नाहीय

आधी फेस्टिव्हल्स महिनाभर तरी चालायचे. पण आता ते चार-पाच दिवसांतच उरकले जातात. फेस्टिव्हल्सची माहिती विद्यार्थ्यांना नीट मिळत नाही. एकांकिका वगैरे कधी होतात ते कळत नाही. जीएसच नसल्यामुळे आमच्यापर्यंत ही माहिती अधिकृतपणे पोहोचत नाही.

मधुरा कुलकर्णी
टीवायबीकॉम, पेंढारकर कॉलेज

...........................................................


नेतृत्वाचा प्लॅटफॉर्म

कॉलेज प्रशासन आणि विद्यार्थी यांच्यातला प्रभावी दुवा म्हणजे निवडून आलेला प्रतिनिधी. विद्याथीर् आणि कॉलेज प्रशासन यांच्यात विचारांचं आदानप्रदान प्रभावी होण्यासाठी विद्यार्थी संघटनांचं अस्तित्व महत्त्वाचं असतं. या शैक्षणिक वर्षात जीएसच्या निवडणुका लांबणीवर टाकून विद्यार्थ्यांचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न केल्याच्या मुद्द्यात तसं काही तथ्य वाटत नाही. जीएस निवडणुकांना राजकिय किनार लाभल्याने त्या पारदर्शकतेपासून मात्र दूर गेल्या आहेत असं विद्यार्थ्यांना वाटतंय. या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांमधली धनदांडग्यांची मुलं पैशांच्या जोरावर निवडून येतात. त्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या प्रश्नांशी फारसं देणंघेणं नसतं. सर्वच राजकीय पक्ष तरुणांना डोळ्यांसमोर ठेवून पडद्यामागून कॉलेज निवडणुकांमध्ये प्रवेश करून आपल्या पोळ्या भाजून घेतात. हे कुठेतरी थांबायला हवं. जीएसच्या निवडणुकांमधून विद्यार्थ्यांना नेतृत्व करण्यासाठी व्यासपीठ मिळतं हे मात्र नक्की.

अंकुर मयेकर

...........................................................

प्रश्न कुणासमोर मांडायचे?

जीएस नसल्याचा मुख्य तोटा फेस्टिव्हल्सना होणार आहे. अद्याप फेस्टिव्हल्सची तयारी बिलकूल होऊ शकलेली नाही. विद्यार्थ्यांमध्ये अंतर्गत राजकारण वाढलेलं असून त्याचा परिणाम उत्साही विद्यार्थ्यांच्या कामावर होतोय. लिफ्ट सुरू नसणं, क्लासरुम कॅण्टिनपासून दूर असणं असे अनेक प्रॉब्लेम्स विद्यार्थ्यांना जाणवत असतात. ते योग्य त्या फोरमवर जीएसच मांडू शकतो असं मला वाटतं. पण जीएसची नेमणूकच अद्यापि न झाल्याने हे प्रश्न कुणासमोर मांडायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

पल्लवी आपटे

संकलन :
मीनाक्षी कुलकर्णी
कॉलेज क्लब रिपोर्टर