Monday, May 2, 2011

Gudhipadwa article- aamod gadre- pardeshatil yashaswi tarun

एखादी व्यक्ती कितीही यशस्वी झाली ना, तरीही माणूस म्हणून ती किती मोठी आहे हे महत्वाचं.... तुम्ही कितीही यशस्वी झालात, तरी एक माणूस म्हणून लोकं तुमचा किती आदर करतात हे तुमच्या वागण्या-बोलण्यावर अवलंबून असतं.. आणि अशा वेळेस महत्वाचे ठरतात ते तुमचे संस्कार जे तुम्हाला यशस्वी व्हायला नेहेमीच मदत करतात..
आमोद गद्रे.... अमेरिकेतील डेट्रॉईट येथे "जनरल मोटर्स" या जगातील पहिल्या क्रमांकाच्या कंपनीत गेली दहा-बारा वर्षांपासून काम करत आहेत. आणि सध्या पुण्यात लीड प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत आहेत. १९९८ साली भारतातून मे़कॅनिकल इंजिनीअरिंग पूर्ण केल्यावर मास्टर्स करण्यासाठी अमोदने अमेरिकेतील " ओहायो" राज्यातील "टोलीडो "युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला. इतर अनेक तरुणांप्रमाणेच जनरल मोटर्समध्ये काम करण्याच स्वप्न मनाशी बाळगून मेहनतीने वाटचाल सुरू केली. आणि त्याचाच परिणाम म्हणजे आज तो पुण्यात लीड प्रोजेक्ट मॅनेजर ( इंजिन असेम्ब्ली आणि टेस्ट ) काम करतोय. गेल्या १२ वर्षात त्याने अमेरिकेतच नव्हे तर मेक्सिको मधेही इंजिन असेम्ब्ली आणि टेस्ट लाईन्स उभारल्या आहेत आणि आता भारतात इंजिन असेम्ब्ली आणि टेस्ट लाईन उभारण्यासाठी deputation वर जनरल मोटर्स कंपनी तर्फे आला आहे.
अमेरिकेत काम करणं हा एक सुखद तसाच वेगळा अनुभव होता. वेगळी संस्क्रुती, वेग ळ्या वातावरणात शून्यातून करीअर उभं करताना खूप कष्ट तर करावे लागले पण मी हेही लक्षात ठेवलं की मी स्वत:च्या देशाच प्रातिनिधीत्व करत होतो. तुमचे ध्येय काय आहे, हे एकदा स्प्ष्ट झाल्यावर ते साध्य करण्यासाठी सकारात्मक द्रुष्टिकोन ठेवून प्रयत्न्न करण महत्वाच असत. पण तेव्हाही हे लक्षात ठेवल पाहिजे की, तुम्ही कितीही मोठ्ठे व्हा स्वत:ची ओळख, तत्व विसरू नका. यशाची नशा चढता कामा नये. तरच माणूस म्हणूनही मोठ्ठे व्हाल. तेच यशाचे खरे गमक आहे.

"टूनपूरचे मराठी सुपरहिरो"

वर्षाचा शेवटचा महिना उजाडलाय, सगळीकडे उत्साहाचं, सेलिब्रेशनच वातावरण आहे. मग यात 'बॉलिवूड' तरी कसं मागे राहील? “ टूनपूर का सुपरहीरो” या चित्रपटाच्या निमित्ताने या वर्षाअखेरीस "३डी अ‍ॅनिमेशन आणि लाईव्ह अ‍ॅक्शन" असा एक वेगळा प्रयोग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आणि या चित्रपटाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाची जान असलेलं ' अ‍ॅनिमेशन वर्क' करणारे सर्व अ‍ॅनिमेटर्स मराठी असून हॉलिवूडच्या तोडीस-तोड हा चित्रपट बनला आहे. "क्लाईंब मिडीयाच्या किरीट खुराणा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून कंपनीतील त्यांचे सहकारी अरूण माने, प्रशांत शिकारे, रविराज कुंभार आणि अरविंद शिर्के यांनी अ‍ॅनिमेशनची धुरा आपल्या खांद्यावर यशस्वीपणे सांभाळली आहे.

ब्लॉकमध्ये किरीट खुराणा (दिग्दर्शक) - हा चित्रपट म्हणजे आम्हा सर्वांसाठी एक मोठ आव्हान होतं, कारण एक तर अतिशय मोजक्या लोकांच्या सहायाने काम पूर्ण करायच होत . हॉलिवूड सारख्या सगळ्या नवीन टेक्नॉलॉजीही आमच्याकडे उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे हा चित्रपट बनवण्यात आमच्या अ‍ॅनिमेटर्सनी सिंहाचा वाट उचलला आहे. दिवस-रात्र मेहनत करून, कधीकधी माझा ओरडा खाऊन, मूड सांभाळून घेतला पण कोणीही बॅक-आऊट नाही केलं, आणि त्यामुळेच हे अवघड आव्हान पेलणं सोप झालं.

या चित्रपटावर गेली ३ वर्ष काम करणारे आणि चित्रपटाच 'प्री-प्रोडक्शनच' , कॅरॅक्ट् र डिझाईनिंग, सीनची लांबी, म्हणजेच शूट होण्यापूर्वी करावी लागणारी पूर्ण तयारी वगैरे सर्व व्यवस्थित सांभाळणारे प्रशांत शिकारे, 'क्लाईंब मिडीया'मध्ये गेली ५ वर्ष काम करत आहेत. घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे त्यांना अ‍ॅनिमेशनच तंत्रशुध्द प्रशिक्षण घेता आलं नाही, पण तरीही या क्षेत्रा त पाऊल टाकल्यावर अनेक गोष्टी शिकत, आत्मसात करत, तर कधी चुका करत ते इथवर पोचले आहेत. 'टूनपूर'बद्दल ते सांगतात की या चित्रपटात " एक ५४ सेकंदाचा सीन आम्हाला सलग( १ टेक ओके) करायचा होता, आणि त्यावेळेस माझी खरी परीक्षा होती, कारण मी आत्तापर्यंत फक्त जाहि रातींसाठी अ‍ॅनिमेशन केले होतं, चित्रपटसाठी अ‍ॅनिमेशन हा एक नवीन अनुभव होता. मग सीन कसा शूट होणार, कॅमेरा अँगल्स, या सगळ्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला आणि तो सीन "१ टेक ओके" केला. हा माझ्यासाठी एक वेगळा आणि आत्मविश्वास देणारा अनुभव होता.

चित्रपटातील 'प्री-प्रोडक्शनच' (pre – production) च्या कामात प्रशांतला मदत करणारा आणि अ‍ॅनिमेटेड कॅरॅक्टर्सचे (पात्रांचे) रंग, कपडे, वेशभूषा आणि चित्रपटाती सर्व भागांच कलरिंग सांभाळणारा कोल्हापूरचा रविराज कुंभार हा लहानपणापासूनच खूप सुंदर चित्र काढायचा. घरी सगळेजण कलाकार असल्याने पोषक वातावरणही होते. त्यामुळे त्याने 'कोल्हापूरच्या' कलानिकेतन महाविद्यालयातून ‘फाईन आर्ट्सचा’ ५ वर्षांचा कोर्स पूर्ण केला आणि गेली ३ वर्ष तो 'Climb Media' मध्ये काम करतोय. सेट मॅक्स चॅनलवरचा दिवाना टायगर, अॅतक्शन अण्णा, ब्रिटानिया टायगर अशा अनेक ' निमेटेड' जाहिराती प्रशांतच्या सहाय्याने करणार्‍या रविराजला 'टूनपूर' मुळे मोठा ब्रेक मिळालाय. यातली सगळी 'अ‍ॅनिमेटेड' characters ही आजूबाजूच्या परिसरातल्या आधारलेल्या लोकांवरूनच (observation) करून घेतली आहेत. आणि त्यामुळे त्यांचे कपडे - बोलणं, चालणं, अगदी खरंखुरं वाटतं, ह्याच श्रेय रविराजच्या 'निरिक्षण शक्तीलाच' जातं.

अ‍ॅनिमेशन क्षेत्रात गेल्या १३ वर्षांपासून असणारे "अरुण माने" हे "क्लाईंब मिडीया"चे ३डी स्टुडियो प्रमुख तर आहेतच पण या चित्रपटासाठी 'टेक्निकल डिरेक्टर ' म्हणूनही त्यांनी कम पाहिलय. याबद्दल ते सांगतात, अतिशय कमी लोकांना बरोबर घेऊन एवढ्या मोठ्या लांबीचा चित्रपट तयार करणं हे आमच्यासाठी एक आव्हानच होतं. पण तरीही हे आव्हान पेलून एकीकडे या चित्रपटावर(जे आमच एक स्वप्न आहे) काम करत, आम्ही आमच्या नेहमीच्या क्लायंट्सची कामही यशस्वीपणे पूर्णही केली.

या क्षेत्रात येणार्‍यांनी (तरुणांनी) हे लक्षात ठेवलं पाहिजे की, झोकून देऊन काम करता यायला हवं... जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या प्रोजेक्ट्वर काम करत असता तेव्हा फक्त ढोर मेहनत करून चालत नाही, तर तुम्हाला तुमच काम अतिशय कल्पकतेने आणि हुशारीने करता यायला हवं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 'संयम' बाळगणे. आपण खूप मेहनत करून एखाद काम पूर्ण करतो, पण ते समोरच्याला आवडेलच असं नाही अशा वेळेस जो निराश न होता तितक्याच प्रयत्नपूर्वक आणि कामाची गती वाढल्यावरही झोकून देऊन काम करतो तो नक्कीच यशस्वी होतो.

तुमची जर मनापासून भरपूर मेहनत केलीत, तर तुम्हाला यश हमखास मिळतेच, हे या तिघाही मराठी तरुणांच्या उदाहरणावरून हे नक्कीच सिद्ध होत.

ब्लॉक मध्ये (अरविंद शिर्के)- बॅकबोन ऑफ कंपोझिशन डिपार्टमेंट - क्लाईंब मिडियाचे संस्थापक भीमसेन खुराणा यांच्याबरोबर सुरुवातीपासून काम करणारे अरविंद शिर्के कंपोझिशन डिपार्टमेंटचे आधारस्तंभ आहेत. गेल्या २०-२५ वर्षातील तंत्रज्ञानाचा प्रवास जवळून पाहिलेले शिर्के सांगतात, पूर्वी आम्हाला एक सीन शूट करून त्याच एडिटिंग पूर्ण करायला १-२ दिवस सहज लागायचे, पण तेच काम आता अर्ध्या तासाच्या आतच होत. या चित्रपटाबद्दल ते म्हणतात की आधी आमच्या कंपनीने बर्‍याच अ‍ॅनिमेटेड जाहिराती बनवल्या आहेत, पण आता पहिल्यांदाच आम्ही एवढ्या मोठ्या लांबीची ३डी आणि लाईव्ह अ‍ॅक्शन फिल्म बनवली आहे. अवघ्या १०-१५लोकांच्या सहाय्याने हे काम करणं म्हणजे एक आव्हानच होतं, पण तरीही या सगळ्या मुलांनी खरच खूप उत्तम काम करून, 'सुंदर' साँग बनवलय, यात शंकाच नाही. (25/12/2010)

Ubharti Tarunai

इंग्रजांनी भारताला दिलेल्या अनेक बर्‍यावाईट गोष्टीपैकी क्रिकेट ही एक अशी गोष्ट आहे की ह्या खेळातली गंमत, जोश अजून टिकून आहे पण त्याबरोबरच नव्या स्वरूपातल्या स्पर्धांमुळे येणारा प्रचंड पैसा ह्यामुळे आपल्या देशात 'क्रिकेट' हा आता इंग्रजांनी दिलेला नुसता खेळ राहिला नसून तो एक धर्मच झालाय. अन् एक मोठा उद्योगही! अन् ह्या धर्माचे लोक कुणीही अगदी कुणीही असू शकतात! ह्यात जात हा मुद्दा गौण ठरतो! सगळे जण मोठ्या भक्तिभावाने आपापल्या लाडक्या दैवतांची पूजा करतात आणि आता तर 'सचिन' नावाच्या देवासाठी फेब्रुवारीत होणारं विश्वचषकाच महायुद्ध जिंकायला भारतीय संघ पुर्‍या तयारीने उतरेल ह्यात वादच नाही. ह्याच दरम्यान मागच्या महिन्यात ठाणे परिसरातील काही उदयोन्मुख क्रिकेट खेळाडू थायलंडचा दौरा गाजवून आले त्या निमित्ताने ह्या दौर्‍याचा आढावा व तरूण खेळाडूंशी बातचीत करून यंग जनरेशन मधलं टॅलेन्ट पुढं आणण्याचा हा एक छोटासा प्रयत्न -

ठाणे जिल्यातील दहा होतकरू तरूण नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात बँकॉक (थायलंड) येथे २७ व्या रॉयल "बँकॉक स्पोर्ट्स क्लबच्या इंटरनॅशनल क्रिकेट सिक्सेस" ह्या स्पर्धेत खेळण्यासाठी निवडले गेले. हे सर्व तरूण राज क्रिकेट अ‍ॅकेडमी,(RCA) ठाणे येथे श्री.बाळा शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतात. ठाण्याचा ह्या क्लबने सलग चौथ्या वर्षी भारताचं प्रतिनिधित्व केलं. भारताबरोबरच ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, साउथ आफ्रिका, न्युजीलंड, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, मलेशिया इ. देशांचे २९ क्रिकेट क्लब्स ह्या स्पर्धेत सहभागी झाले. ह्या वर्षी २० -२३जानेवारी दरम्यान ही स्पर्धा रॉयल बँकॉक स्पोर्ट्स क्लबवर झाली.

स्पर्धेचा आराखडा (फॉर्मॅट) -
ह्या स्पर्धेत प्रत्येकी सहा खेळाडू आपापल्या संघाच प्रतिनिधित्व करतात. ज्यावेळी एक संघ बॅटिंग करतो तेंव्हा प्रतिस्पर्धी संघाचे सहा खेळाडू मैदानात क्षेत्ररक्षण करतात ह्यात एक विकेटकीपर, एक बॉलर आणि चार क्षेत्ररक्षक असतात. प्रत्येक मॅच ही पाच षटकांची असते.

RCA ची स्पर्धेतली कामगिरी -
ह्या वर्षी राज क्रिकेट अ‍ॅकॅडमीच्या (RCA) टीमने आपल्या पहिल्याच मॅचमध्ये पाकिस्तानच्या - यूबीएलब्ल्यू (UBL Blue) टीमवर विजय मिळवला. UBL Blue ने प्रथम फलंदाजी स्वीकारत पाच षटकात ६० धावा केल्या. जिंकण्यासाठीच हे आव्हान RCA नं चौथ्या षटकातच गाठलं. RCA च्या मन्मथ आपटेने २० धावा काढल्या तर सुरज शेट्टी २६ धावांवर नाबाद राहिला. पुढच्या साखळी सामन्यात RCA नं स्पोर्ट्स प्रमोटर्स (Sports Promoters (Gujrat) च्या ५६ ह्या धावसंख्येच्या पाठलाग पाच षटकात तीन बाद ५८ असा करत हाही सामना जिंकला. ह्या सामन्यात सुरज शेट्टी २८ धावांवर नाबाद राहिला तर मन्मथ आपटे २६ धावांवर नाबाद राहिला. RCA नं उपांत्य फेरीत धडक मारली. पण ते फायनल मध्ये पोचू शकले नाहीत.

कोच व खेळाडूंशी झालेली बातचीत -

श्री. बाळा शेट्टी - कोच - राज क्रिकेट अ‍ॅकॅडमी - ठाणे.
राज क्रिकेट अ‍ॅकॅडमी २००३ साली स्थापन करणारे बाळा शेट्टी मुळचे मुंबईचेच. क्रिकेटची अतिशय आवड अन् ह्या खेळासाठी घरचा पाठिंबा, कठोर मेहनत ह्यामुळेच ते एक उत्कृष्ठ खेळाडू बनले. १२वी नंतर पुढील शिक्षणासाठी बंगळुरूच्या (तेंव्हाच बँगलोर) सेंट जोसेफ कॉलेजमध्ये गेले. शिक्षणाबरोबरच क्रिकेटचेही तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेत त्यांनी अनेक आंतर - महाविद्यालयीन मॅचेसमध्ये महत्वाची कामगिरी बजावली. 'ब्रिजेश पटेल यांच्या टीममध्ये, कधी स्वस्तिक युनियन टीम बरोबर खेळताना १९८५ साली भारतात आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या कोचिंग कॅम्पमध्ये अनेक रणजी व टेस्ट खेळाडूंबरोबर मैदान शेअर केले. तसेच कर्नाटक राज्याच्या टीममधून खेळताना १९९१ ते १९९३ - सलग तीन वर्ष 'इंग्लंड' मधील 'कौंटी' क्रिकेटही खेळले. ९३ साली झालेल्या एका अपघातामुळे त्यांना काही वर्ष सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. पण तेंव्हाही स्वस्थ न बसता, घरचा 'बिझनेस' यशस्वीपणे चालवला. २००२ साली पूर्णपणे बरं झाल्यावर, त्यांच्या मनातल्या आत्मविश्वासामुळे त्यांनी पुन्हा 'क्रिकेटवर' लक्ष केंद्रीत करण्याचे ठरवले. पण यावेळेस स्वत: न खेळता आपल्या अनुभवाचा, ज्ञानाचा उपयोग दुस र्‍यांना करून द्यावा, याच उद्देशानेच २००३ साली त्यांनी 'राज क्रिकेट अ‍ॅकॅडमी' ची स्थापना केली. आणि तेंव्हापासूनच ह्या अ‍ॅकॅडमीतील मन्मथ आपटे, सूरज शेट्टी, ओंकार राणे, जयेश पाटील, नील भानुशाली, शमीम शेख यासारख्या अनेक होतकरू, गुणी खेळाडूंनी मैदान गाजवण्यास सुरूवात केली.

कठोर सराव, रेग्युलर फिटेनस टेस्ट्स याबरोबर अनेक प्रॅक्टिस मॅचेस (साधारण आठवड्याला एक) हे या अ‍ॅकॅडमीच्या यशाच गमक! याबाबत श्री. बाळा शेट्टी सांगतात की, मी आमच्या पिढीतील अनेक खेळाडूंना घडताना पाहिलंय. सचिन, राहूल, लक्ष्मण, यांच्यासारखे खेळाडू ढोर मेहनत तर अजूनही करतात ती कुणालाच चुकलेली नाही, पण त्याबरोबरच त्यांच्या ठायी नम्रपणा, शिकण्याची वृत्ती आजही दिसून येते. आज माझ्या अ‍ॅकॅडमीतील प्रत्येक खेळाडूत गुणवत्ता ठासून भरल्ये. पण त्याबरोबरच त्यांना फिटनेस राखणे अत्यावश्यक आहे. सातत्य, फिटनेस, निश्चयाने प्रॅक्टीस करणे, आत्मविश्वास हे आज यशस्वी होण्याचे की फॅक्टर्स आहेत. आणि त्याबरोबरच सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिस्त. ती अंगी बाणवली, तरच तुम्ही यशस्वी व्हाल आणि टिकूनही रहाल.

अ‍ॅकॅडमीच्या आजवरच्या प्रवासात आत्तापर्यंत आम्ही देशातल्या तसेच परदेशातल्या अनेक टीम्सबरोबर अनेकदा खेळलो आहोत. श्रीलंका, बँकॉक, इथे आत्ताच आमची टीम जाऊन आली. ह्या दौ र्‍यात आमच्या मुलांना तिकडे खेळून त्यांची टेक्निक्स जाणून घेता आली, तिथल्या सिनियर्सशी बोलून मार्गदर्शनही मिळालं ज्याचा उपयोग नक्कीच भविष्यात होईल. अजून सुधारणेसाठी त्यांनी जास्तीत जास्त प्रॅक्टीस मॅचेस खेळाव्यात याकडे आमचा कल असतो.


मन्मथ आपटे - फर्स्ट इयर बी. कॉम. - व्ही. पी. ए म्स. आर. झेड. शहा कॉलेज - मुलुंड.
पाच सहा वर्षांपासून / ( वयाच्या १४व्या वर्षापासून) क्रिकेट खेळतोय. या सरांची ओळख व्हीपीएम कॉलेजमधून खेळत असताना झाली. गेल्या सहा महिन्यापासून श्री. बाळा शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली राज क्रिकेट अ‍ॅकॅडमीत प्रशिक्षण घेतोय. इथं आल्यापासून बॅटिंग आणि फिटनेसवर कठोर मेहनत घेतल्यामुळे इंप्रूव्हमेंट झाली. बॅटिंग टेक्निकमुळे परफॉर्मन्स बहरत गेला. भारताबाहेरची ही माझी पहिलीच टूर. श्रीलंकेत मी पूर्ण सीरीजमध्ये कर्णधार बनण हा माझ्यासाठी एक सुखद धक्का होता , पण त्यबरोबरच थोडं दडपणही आलं होतं. पण आमच ओव्हर-ओल पर्फॉरम्न्स खूप छान झाला, आणि माझ्या (बॉलिंग) कामगिरीवर सरही खुश होते. आमच्या या टूरच आणखी एक वैशिष्ट्य म्ह ण जे आमच सगळ्यात छोटा खेळाडू ' नील भानुशाली'. अवघ्या चौथीत ल्या नील च्या खेळ्ण्यात एक मॅच्युरिटी दिसून येते. अजून तो लहान अस ला तरी, जसाजसा तो मोठा होत जाईल, तसतसा त्याचा स्टॅमिना आणि कॉन्फिडन्स वाढत जाईल, आणि तो एक सरस खेळाडू बनेल यात शंकाच नाही.
बँकॉक आणि श्रीलंकेच्या टूरमधून आम्हाला बरच काही शिकायलाही मिळालं. तिकडची पिचेस, खेळ्ण्याची ट्क्निक्स बरीच प्रगत आहेत. आणि तेथील खेळाडू बरेच मोठे आणि अनुभवी होते, त्यामुळे आम्हालाही बरंच काही शिकायला मिळालं.

सुरज शेट्टी - फायनल इयर - मेकॅनिकल इंजिनियरिंग - दत्ता मेघे कॉलेज - ऐरोली.
क्रिकेट हे माझं सर्वस्व / पॅशन आहे. गेली १२ वर्ष मी क्रिकेट खेळतोय. शेट्टी सर हे माझ्या वडिलांचेच मित्र गेल्या सात आठ महिन्यांपासून मी शेट्टी सरांकडे कोचिंग घेतोय. सर आमच्यावर खूप मेहनत घेतात आणि त्याचा आमच्या फिटनेसवर, ओव्हर ऑल गेम वर पॉझिटिव्ह परिणाम होताना जाणवतोय. नुकत्याच झालेल्या बॅकॉक टूरवर जाऊन आलो तिथं आम्ही गुजरात, हैद्राबाद, कोलकाता (पूर्वीच कलकत्ता) ह्या आपल्या देशातल्या टीम्स विरुद्ध खेळलोच तसंच पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, मलेशिया, बहारिन ह्या टीम्स विरूद्धही खेळलो आणि सेमी फायनलपर्यंतही पोहचलो. तिथं आम्हाला अनेक सिनिअर खेळाडूंशी बातचीत करता आली त्यांच्या मार्गदर्शनाचा आम्हाला खूप फायदा झाला. ह्या स्पर्धेतील बरेचसे खेळाडू इंटरनॅशनल लेव्हलवर खेळलेले होते. साहजिकच त्यांच्या बरोबरच्या प्रत्येक सामन्यातली लढतही अतिशय अटीतटीची झाली. अर्थात हे आम्हाला अपेक्षित होतच. ह्या अनुभवाचा फायदा आम्हाला भविष्यात आमची टीम बळकट करण्यात नक्कीच होईल असा मला विश्वास वाटतो.


women's day Article on Mayuri Apte

" प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे" अशी एक म्हण आहे, आणि असेच अथक प्रयत्न करून जिद्दीने आपल्या पायांवर यशस्वीपणे उभी राहून दाखवणार्‍या मयुरी आपटे या मूक-बधिर, पेंढारकर महाविद्यालयात "बी.एस्स.सी"च्या तृतीय,वर्षाला शिकणार्‍या तरुणीचा परवा भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या हस्ते "अलौकिक प्रतिभा" पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

डोंबिवलीत लहानाची मोठी झालेल्या मयुरीला लहानपणापासूनच ऐकू येत नव्हते, पण तरीही तिच्या पालकांनी तिच्या बालपणीच्या जडणघडणीत मोठा वाटा असलेल्या बागुल मॅडम यांच्या सल्ल्याने इतर मुलांसारखीच वागणूक दिली, आणि तिला एखाद्या विशेष शाळेत न घालता "स्वामी विवेकानंद, दत्तनगर" इथल्या (नॉर्मल) मुलांच्या शाळेतच तिने १०वी पर्यंत यशस्वीपणे शिक्षण पूर्ण केलं. तिच्या या प्रवासाबद्दल तिची आई माधुरी आपटे सांगत असतात, 'मयुरीचा हा आमच्या आणि तिच्या आणि आमच्यासाठीही सोपा नव्हता. ती दीड वर्षांची असताना आम्हाला तिच्या आजाराबद्दल लक्षात आलं, हॉस्पिटलमध्ये जाऊन चेकिंग केल्यावर कळलं की ऐकू येण्याच्या काही नसा दाबल्या गेल्या आहेत, आणि त्यावर काही कायमस्वरुपी इलाज नसल्याने 'श्रवणयंत्राच्या' सहाय्याने तिने पुढे वाटचाल सुरु ठेवली. तस बघायला गेलं तर शाळांमधे अशा मुलांसाठी बर्‍याच सवलती असतात, त्यांना रेग्युलर (भाषा)लँग्वेजेस शिकणं कठीण पडतं म्हणून चित्रकला, टायपिंग असे तुलनेने अनेक सोपे विषय अभ्यासाला मिळतात. पण आम्ही तिला नॉर्मल मुलांच्या शाळेत घालतानाच ठरवलं होतं की कोणतही कन्सेशन न घेता रेग्युलर शिक्षण पूर्ण करायचं. आणि त्याप्रमाणेच तिने बरीच मेहनत घेऊन, शिक्षक आणि मित्र-मैत्रिणींच्या मदतीने अभ्यास करून १०वीला७४% मिळवले.

पण त्यानंतरचा प्रवास थोडा जास्त खडतर होता, मयुरी हातवारे करत, थोडफार बोलायचा प्रयत्न करत सांगत असते. ' पेंढारकर कॉलेजमध्ये सायन्सला अ‍ॅडमिशन घेतली खरी, पण पहिले ३-४ महिने खूप कठीण होते. नवीन अभ्यासक्रम, शिक्षक, विद्यार्थी सगळेच नवीन, कोणीच मित्र-मैत्रीणी नाहीत, कोणालाच माझ्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. . आणि तेव्हा एका विषयासाठी ३-४ वेगवेगळे शिक्षक होते. त्यामुळे पहिले काही दिवस आई रोज माझ्याबरोबर कॉलेजला यायची, माझ्या शिक्षकांना , वर्गातल्या इतर मुलांना भे टून ओळख करून द्यायची, अस करत करत मग मी हळूहळू तिथे सेटल होत गेले . आणि गेल्या पाच वर्षात मला एकदाही एकटं वाटल नाही, सगळ्या शिक्षकांनी, माझ्या मित्र-मैत्रिणींनी खूप सांभाळून घेतलं, लेक्चरमध्ये, अभ्यासात खूप मदत केली. कॉलेजमध्येपण आम्ही सगळ्या स्पर्धांमध्ये, फेस्टीव्हल्समध्ये ,मध्ये खूप धमाल केली, आणि ही ५ वर्ष कशी निघून गेली कळलंही नाही.

अभ्यासाबरोबरच मयुरीला वाचनाचीही खूप आवड आहे. वेगवेगळ्या लेखकांची आत्मचरित्र वाचणं तिला जास्त आवडतं. 'एक होता कार्व्हर', ' इडली, ऑर्किड आणि मी', ' अग्निपंख' ही तिची विशेष आवडती पुस्तकं . या २-३ पुस्तकांची तर मी अक्षरशः पारायण केली आहेत. माणसाने किती प्रयत्नशील असावं, परिस्थितीवर मात करून कस पुढे जायचं, यशस्वी व्हावं, हेच या पुस्तकांनी मला शिकवलं.

माजी राष्ट्रपती अब्दुल कलामांकडून पुरस्कार मिळणार आहे हे जेव्हा तिला कळलं , तेव्हा खर तर ती थोडी घाबरलीच, नर्व्हस झाली. मला का हा पुरस्कार मिळतोय? मी अस काय मोठ यश मिळवलय, जे काही केलं ते तुम्हीच ( आई-वडिलां नी) केलेल्या प्रयत्नांमुळे आहे. पण नंतर मी तिला कारण सांगितल की, '२०११ हे वर्ष "ईयर ऑफ केमिस्ट्री" म्हणून घोषित करण्यात आलयं. त्यामुळे हा पुरस्कार देण्यासाठी 'केमिस्ट्री'मध्ये यश मिळवलेल्या एका यशस्वी तरुणीचा ३ महिने शोध घेऊन 'आरोहण' संस्थेने ह्या पुरस्कारासाठी तुझी निवड केली आहे. ह्या सत्कारामुळे तुझ्यासारख्या अनेक मुलांना आणि त्यांच्या पालकांना प्रेरणा मिळेल, तेही त्यां च्या पायांवर स्वतंत्रपणे उभे राहून एक यशस्वी जीवन जगू शकतील. हे सांगून आई-बाबांनी मला हेही बजावल की ' हा पुरस्कार तुझ्या मेहनतीच बक्षीस आहे, पण म्हणून हुरळून न जाता, पाय जमिनीवरच ठेऊन पुढच लक्ष्य गाठ आणि यशस्वीपणे पुढे जात रहा.'

तिच्या या जिद्दीला आमचा सलाम आणि पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा..!!

My articles some are already published

कॉमेडी एक्सप्रेसमधल्या धडाकेबाज कॉमेडीप्रमाणेच त्यातला 'बॅन्ड'सुद्धा खूप लोकप्रिय आहे. " लेडीज स्पेशल बॅन्ड" आणि त्या मुली ही बाकीच्या कार्यक्रमातल्या इतर वादकांप्रमाणे फेमस झाल्या आहेत. त्यातलीच एक परफॉर्मर आहे गिटारिस्ट 'सुखदा भावे.' डोंबिवलीत लहानाची मोठी झालेल्या सुखदाने 'रुईया'मधून ग्रॅज्युएशन केलयं, त्यामुळे कलेशी तिचं नातं स्पष्ट होतचं.
५वीत असल्यापासून सुखदाने 'हार्मोनियमचं' शास्त्र शुद्ध प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली, त्यामुळे तिचा क्लासिकलचा बेस तर पक्का झालाच. त्याबरोबरच आवड म्हणून ती गिटार आणि की-बोर्ड सुद्धा वाजवायला लागली. गिटारच प्रशिक्षण तर घेतलं,पंण की-बोर्डवर तिचे हात आपोआपच फिरायला लागले. नवनवीन प्रयोग करत, ती शिकत गेली. घरातील सर्वजण या ना त्या निमित्ताने संगीताशी जोडले गेले असल्याने हे सगळं करत असताना घरच्यांच्या भक्कम सपोर्ट मिळतो, आपल्या या प्रवासाबद्दल सुखदा सांगत असते
आत्ता जरी मी 'शो'जमधून गिटार वाजवत असले तरी मला स्वतःला ' हार्मोनियम' वाजवायला जास्त आवडतं. त्याच शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मी घेतल नाही, पण तरीही त्यावर नवीन धून तयार करायला, प्रयोग करायला मला जास्त आवडत. लहानपणापासूनच मला संगीताची आवड होती, त्यामुळे कॉलेजमध्ये प्रवेश घेतानाच मी 'म्युझिक कंपोझर' होण्याच नक्की केलं होतं. आणि म्हणूनच 'रुईया'सारख्या कलेशी निगडीत कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन एकांकिकांना ‘म्युझिक’ देणं सुरु केलं. त्याबरोबरच या क्षेत्राची पूर्ण माहिती मिळवण्यासाठी, काम समजून घेण्यासाठी मुंबई युनिव्हर्सिटीमधून 'म्युझिक कंपोझिशन अ‍ॅन्ड डिरेक्शन ' आणि ' साऊंड रेकॉर्डिंग असे कोर्सही पूर्ण केले. या कोर्स दरम्यान मला बाकीच्या इतर वाद्यांचीही ओळख झाली व हात बसला. तसंच अनिल मोहिलेंसारख्या मोठ्या माणसांच मार्गदर्शनही मिळालं. आणि त्यामुळेच मी या क्षेत्रात ५-६ वर्षांपासून यशस्वीपणे काम करत आहे. आत्तापर्यंत मी अनेक एकांकिकाना संगीत दिलंय, तसंच निखिल महाजनांच्या 'अंतस्थिती' चित्रपटाबरोबरच त्यांच्या आगामी चित्रपटासाठीही संगीत दिग्दर्शन केलंय. अन् एकीकडे माझ्या स्वत:च्या अल्बमच काम सुरू झालंय, ज्यात आठ गाणी असून हा अल्बम धार्मिक असला तरी त्याला Fusion टच दे ण्यात, आला आहे.
डोंबिवलीत झालेल्या 'पुलोत्सवात' रवींद्रनाथ टागोरांच्या पु. लं. नी अनुवादित केलेल्या कविता संगीतबद्ध करून नृत्य सादर केली होती. तसंच भविष्यात मला स्वत:च्या काही कवितांनाही चाल लावून ' कवितांच्या गाण्यांचा' अल्बम काढण्याचा मानस आहे. आत्तापर्यंतच्या या वाटचालीबाबत मी खुष आहे, कारण मला माझ्या आवडीच्या क्षेत्रात मनाप्रमाणे काम करता येतंय. आणि त्यात घरच्यांबरोबरच या क्षेत्रातील दिग्गजांचाही आशिर्वाद आणि मार्गदर्शन मिळतंय. याबाबत ती सांगते की - एकदा मला प्रसिद्ध संगीतदिग्दर्शक 'श्रीनिवास खळे' यांच्या निवासस्थानी जाऊन भेटण्याचा योग आला. आणि तिथे त्यांना काही स्वत: केलेल्या काही रचनाही ऐकवल्या. त्यांनीही बरंच मार्गदर्शन केलं. तो माझ्यासाठी खरंच एक अविस्मरणीय अनुभव होता.
यापुढेही असंच चांगलं काम करत एक उत्तम वादक म्हणून नाव कमवायचं आहे. तिला हार्दिक शुभेच्छा.