Monday, May 2, 2011

Ubharti Tarunai

इंग्रजांनी भारताला दिलेल्या अनेक बर्‍यावाईट गोष्टीपैकी क्रिकेट ही एक अशी गोष्ट आहे की ह्या खेळातली गंमत, जोश अजून टिकून आहे पण त्याबरोबरच नव्या स्वरूपातल्या स्पर्धांमुळे येणारा प्रचंड पैसा ह्यामुळे आपल्या देशात 'क्रिकेट' हा आता इंग्रजांनी दिलेला नुसता खेळ राहिला नसून तो एक धर्मच झालाय. अन् एक मोठा उद्योगही! अन् ह्या धर्माचे लोक कुणीही अगदी कुणीही असू शकतात! ह्यात जात हा मुद्दा गौण ठरतो! सगळे जण मोठ्या भक्तिभावाने आपापल्या लाडक्या दैवतांची पूजा करतात आणि आता तर 'सचिन' नावाच्या देवासाठी फेब्रुवारीत होणारं विश्वचषकाच महायुद्ध जिंकायला भारतीय संघ पुर्‍या तयारीने उतरेल ह्यात वादच नाही. ह्याच दरम्यान मागच्या महिन्यात ठाणे परिसरातील काही उदयोन्मुख क्रिकेट खेळाडू थायलंडचा दौरा गाजवून आले त्या निमित्ताने ह्या दौर्‍याचा आढावा व तरूण खेळाडूंशी बातचीत करून यंग जनरेशन मधलं टॅलेन्ट पुढं आणण्याचा हा एक छोटासा प्रयत्न -

ठाणे जिल्यातील दहा होतकरू तरूण नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात बँकॉक (थायलंड) येथे २७ व्या रॉयल "बँकॉक स्पोर्ट्स क्लबच्या इंटरनॅशनल क्रिकेट सिक्सेस" ह्या स्पर्धेत खेळण्यासाठी निवडले गेले. हे सर्व तरूण राज क्रिकेट अ‍ॅकेडमी,(RCA) ठाणे येथे श्री.बाळा शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतात. ठाण्याचा ह्या क्लबने सलग चौथ्या वर्षी भारताचं प्रतिनिधित्व केलं. भारताबरोबरच ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, साउथ आफ्रिका, न्युजीलंड, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, मलेशिया इ. देशांचे २९ क्रिकेट क्लब्स ह्या स्पर्धेत सहभागी झाले. ह्या वर्षी २० -२३जानेवारी दरम्यान ही स्पर्धा रॉयल बँकॉक स्पोर्ट्स क्लबवर झाली.

स्पर्धेचा आराखडा (फॉर्मॅट) -
ह्या स्पर्धेत प्रत्येकी सहा खेळाडू आपापल्या संघाच प्रतिनिधित्व करतात. ज्यावेळी एक संघ बॅटिंग करतो तेंव्हा प्रतिस्पर्धी संघाचे सहा खेळाडू मैदानात क्षेत्ररक्षण करतात ह्यात एक विकेटकीपर, एक बॉलर आणि चार क्षेत्ररक्षक असतात. प्रत्येक मॅच ही पाच षटकांची असते.

RCA ची स्पर्धेतली कामगिरी -
ह्या वर्षी राज क्रिकेट अ‍ॅकॅडमीच्या (RCA) टीमने आपल्या पहिल्याच मॅचमध्ये पाकिस्तानच्या - यूबीएलब्ल्यू (UBL Blue) टीमवर विजय मिळवला. UBL Blue ने प्रथम फलंदाजी स्वीकारत पाच षटकात ६० धावा केल्या. जिंकण्यासाठीच हे आव्हान RCA नं चौथ्या षटकातच गाठलं. RCA च्या मन्मथ आपटेने २० धावा काढल्या तर सुरज शेट्टी २६ धावांवर नाबाद राहिला. पुढच्या साखळी सामन्यात RCA नं स्पोर्ट्स प्रमोटर्स (Sports Promoters (Gujrat) च्या ५६ ह्या धावसंख्येच्या पाठलाग पाच षटकात तीन बाद ५८ असा करत हाही सामना जिंकला. ह्या सामन्यात सुरज शेट्टी २८ धावांवर नाबाद राहिला तर मन्मथ आपटे २६ धावांवर नाबाद राहिला. RCA नं उपांत्य फेरीत धडक मारली. पण ते फायनल मध्ये पोचू शकले नाहीत.

कोच व खेळाडूंशी झालेली बातचीत -

श्री. बाळा शेट्टी - कोच - राज क्रिकेट अ‍ॅकॅडमी - ठाणे.
राज क्रिकेट अ‍ॅकॅडमी २००३ साली स्थापन करणारे बाळा शेट्टी मुळचे मुंबईचेच. क्रिकेटची अतिशय आवड अन् ह्या खेळासाठी घरचा पाठिंबा, कठोर मेहनत ह्यामुळेच ते एक उत्कृष्ठ खेळाडू बनले. १२वी नंतर पुढील शिक्षणासाठी बंगळुरूच्या (तेंव्हाच बँगलोर) सेंट जोसेफ कॉलेजमध्ये गेले. शिक्षणाबरोबरच क्रिकेटचेही तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेत त्यांनी अनेक आंतर - महाविद्यालयीन मॅचेसमध्ये महत्वाची कामगिरी बजावली. 'ब्रिजेश पटेल यांच्या टीममध्ये, कधी स्वस्तिक युनियन टीम बरोबर खेळताना १९८५ साली भारतात आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या कोचिंग कॅम्पमध्ये अनेक रणजी व टेस्ट खेळाडूंबरोबर मैदान शेअर केले. तसेच कर्नाटक राज्याच्या टीममधून खेळताना १९९१ ते १९९३ - सलग तीन वर्ष 'इंग्लंड' मधील 'कौंटी' क्रिकेटही खेळले. ९३ साली झालेल्या एका अपघातामुळे त्यांना काही वर्ष सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. पण तेंव्हाही स्वस्थ न बसता, घरचा 'बिझनेस' यशस्वीपणे चालवला. २००२ साली पूर्णपणे बरं झाल्यावर, त्यांच्या मनातल्या आत्मविश्वासामुळे त्यांनी पुन्हा 'क्रिकेटवर' लक्ष केंद्रीत करण्याचे ठरवले. पण यावेळेस स्वत: न खेळता आपल्या अनुभवाचा, ज्ञानाचा उपयोग दुस र्‍यांना करून द्यावा, याच उद्देशानेच २००३ साली त्यांनी 'राज क्रिकेट अ‍ॅकॅडमी' ची स्थापना केली. आणि तेंव्हापासूनच ह्या अ‍ॅकॅडमीतील मन्मथ आपटे, सूरज शेट्टी, ओंकार राणे, जयेश पाटील, नील भानुशाली, शमीम शेख यासारख्या अनेक होतकरू, गुणी खेळाडूंनी मैदान गाजवण्यास सुरूवात केली.

कठोर सराव, रेग्युलर फिटेनस टेस्ट्स याबरोबर अनेक प्रॅक्टिस मॅचेस (साधारण आठवड्याला एक) हे या अ‍ॅकॅडमीच्या यशाच गमक! याबाबत श्री. बाळा शेट्टी सांगतात की, मी आमच्या पिढीतील अनेक खेळाडूंना घडताना पाहिलंय. सचिन, राहूल, लक्ष्मण, यांच्यासारखे खेळाडू ढोर मेहनत तर अजूनही करतात ती कुणालाच चुकलेली नाही, पण त्याबरोबरच त्यांच्या ठायी नम्रपणा, शिकण्याची वृत्ती आजही दिसून येते. आज माझ्या अ‍ॅकॅडमीतील प्रत्येक खेळाडूत गुणवत्ता ठासून भरल्ये. पण त्याबरोबरच त्यांना फिटनेस राखणे अत्यावश्यक आहे. सातत्य, फिटनेस, निश्चयाने प्रॅक्टीस करणे, आत्मविश्वास हे आज यशस्वी होण्याचे की फॅक्टर्स आहेत. आणि त्याबरोबरच सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिस्त. ती अंगी बाणवली, तरच तुम्ही यशस्वी व्हाल आणि टिकूनही रहाल.

अ‍ॅकॅडमीच्या आजवरच्या प्रवासात आत्तापर्यंत आम्ही देशातल्या तसेच परदेशातल्या अनेक टीम्सबरोबर अनेकदा खेळलो आहोत. श्रीलंका, बँकॉक, इथे आत्ताच आमची टीम जाऊन आली. ह्या दौ र्‍यात आमच्या मुलांना तिकडे खेळून त्यांची टेक्निक्स जाणून घेता आली, तिथल्या सिनियर्सशी बोलून मार्गदर्शनही मिळालं ज्याचा उपयोग नक्कीच भविष्यात होईल. अजून सुधारणेसाठी त्यांनी जास्तीत जास्त प्रॅक्टीस मॅचेस खेळाव्यात याकडे आमचा कल असतो.


मन्मथ आपटे - फर्स्ट इयर बी. कॉम. - व्ही. पी. ए म्स. आर. झेड. शहा कॉलेज - मुलुंड.
पाच सहा वर्षांपासून / ( वयाच्या १४व्या वर्षापासून) क्रिकेट खेळतोय. या सरांची ओळख व्हीपीएम कॉलेजमधून खेळत असताना झाली. गेल्या सहा महिन्यापासून श्री. बाळा शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली राज क्रिकेट अ‍ॅकॅडमीत प्रशिक्षण घेतोय. इथं आल्यापासून बॅटिंग आणि फिटनेसवर कठोर मेहनत घेतल्यामुळे इंप्रूव्हमेंट झाली. बॅटिंग टेक्निकमुळे परफॉर्मन्स बहरत गेला. भारताबाहेरची ही माझी पहिलीच टूर. श्रीलंकेत मी पूर्ण सीरीजमध्ये कर्णधार बनण हा माझ्यासाठी एक सुखद धक्का होता , पण त्यबरोबरच थोडं दडपणही आलं होतं. पण आमच ओव्हर-ओल पर्फॉरम्न्स खूप छान झाला, आणि माझ्या (बॉलिंग) कामगिरीवर सरही खुश होते. आमच्या या टूरच आणखी एक वैशिष्ट्य म्ह ण जे आमच सगळ्यात छोटा खेळाडू ' नील भानुशाली'. अवघ्या चौथीत ल्या नील च्या खेळ्ण्यात एक मॅच्युरिटी दिसून येते. अजून तो लहान अस ला तरी, जसाजसा तो मोठा होत जाईल, तसतसा त्याचा स्टॅमिना आणि कॉन्फिडन्स वाढत जाईल, आणि तो एक सरस खेळाडू बनेल यात शंकाच नाही.
बँकॉक आणि श्रीलंकेच्या टूरमधून आम्हाला बरच काही शिकायलाही मिळालं. तिकडची पिचेस, खेळ्ण्याची ट्क्निक्स बरीच प्रगत आहेत. आणि तेथील खेळाडू बरेच मोठे आणि अनुभवी होते, त्यामुळे आम्हालाही बरंच काही शिकायला मिळालं.

सुरज शेट्टी - फायनल इयर - मेकॅनिकल इंजिनियरिंग - दत्ता मेघे कॉलेज - ऐरोली.
क्रिकेट हे माझं सर्वस्व / पॅशन आहे. गेली १२ वर्ष मी क्रिकेट खेळतोय. शेट्टी सर हे माझ्या वडिलांचेच मित्र गेल्या सात आठ महिन्यांपासून मी शेट्टी सरांकडे कोचिंग घेतोय. सर आमच्यावर खूप मेहनत घेतात आणि त्याचा आमच्या फिटनेसवर, ओव्हर ऑल गेम वर पॉझिटिव्ह परिणाम होताना जाणवतोय. नुकत्याच झालेल्या बॅकॉक टूरवर जाऊन आलो तिथं आम्ही गुजरात, हैद्राबाद, कोलकाता (पूर्वीच कलकत्ता) ह्या आपल्या देशातल्या टीम्स विरुद्ध खेळलोच तसंच पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, मलेशिया, बहारिन ह्या टीम्स विरूद्धही खेळलो आणि सेमी फायनलपर्यंतही पोहचलो. तिथं आम्हाला अनेक सिनिअर खेळाडूंशी बातचीत करता आली त्यांच्या मार्गदर्शनाचा आम्हाला खूप फायदा झाला. ह्या स्पर्धेतील बरेचसे खेळाडू इंटरनॅशनल लेव्हलवर खेळलेले होते. साहजिकच त्यांच्या बरोबरच्या प्रत्येक सामन्यातली लढतही अतिशय अटीतटीची झाली. अर्थात हे आम्हाला अपेक्षित होतच. ह्या अनुभवाचा फायदा आम्हाला भविष्यात आमची टीम बळकट करण्यात नक्कीच होईल असा मला विश्वास वाटतो.


No comments:

Post a Comment